Posted by
आधुनिक शेती बळीराजा
दुग्ध व्यवसाय अत्यंत खर्चिक झाला आहे. केवळ डेअरीला दूध घालण्याएेवजी दुधाची थेट विक्री, प्रक्रियायुक्त पदार्थ तयार करणे अशा मूल्यवर्धनातूनच हा व्यवसाय फायदेशीर करता येईल. हीच बाब लक्षात घेऊन राहुरी (जि. नगर) येथील तनपुरे बंधूंनी आपल्या दुग्धव्यवसायाचे स्वरूप बदलले आहे. नगर जिल्ह्यातील राहुरी येथील आप्पासाहेब व प्रकाश हे तनपुरे बंधू सुमारे १७ वर्षांपासून दुग्धव्यवसाय करतात. अर्थात त्यावेळचे व्यवसायाचे स्वरूप तसे पारंपरिक होते. परंतु त्याच वाटेवरून कायम वाटचाल राहिली असती तर प्रगतीचा मार्ग प्रकाशमय झाला नसता. घरच्या दुधाला जोड म्हणून सन २००० च्या दरम्यान दूधसंकलनास सुरवात केली. टप्प्याटप्प्याने हे संकलन चार हजार लिटर प्रतिदिन या संख्येवर पोचले. दुग्धव्यवसायाचा विस्तार टप्प्याटप्प्याने बदलत्या काळाची गरज लक्षात घेत व्यवसायाचा विस्तार सुरू केला. सन २००७ मध्ये काही संकरीत गायी खरेदी केल्या. त्यांची गोठ्यात पैदास सुरू केली. पुढे दुधाचे प्रमाण वाढले. आज इतक्या वर्षात सातत्य, कष्ट, व्यवस्थापन कौशल्य यांच्या जोरावर व्यवसाय एका स्थिर टप्प्यावर आणल्यानंतर चार महिन्यांपूर्वी तनपुरे बंधू प्र...
- Get link
- X
- Other Apps