पुणे ः राज्यातील दुर्गम खेडी आणि वाड्या-वस्त्या आता वाय-फाय हाेणार आहे. पी.सी.आे.च्या धर्तीवर पी.डी.आे. (पब्लिक डाटा आॅफिस) आता गावागावांत कार्यान्वित करण्यात येणार असून, दुर्गम भागातील नागरिकांना या माध्यमातून राेजगारदेखील उपलब्ध हाेणार आहे. टपाल खात्याच्या माध्यमातून ही सेवा लवकरच खेड्यांमध्ये हाेणार आहे.
माेबाईल क्रांतीमुळे संवाद आणि संपर्काची साधने वाढली आणि जग जवळ आले. मात्र अद्यापही अनेक दुर्गम गावांंमध्ये माेबाईलची रेंज नसल्याने अनेक खेडी, वाड्या-वस्त्या संपर्काच्या साधनांअभावी जगापासून दूर आहेत. यासाठी टपाल खात्याच्या वतीने पीसीआेच्या धर्तीवर पीडीआे सेवा देण्यात येणार आहे. पुणे विभागाचे पाेस्ट मास्तर जनरल गणेश सावळेश्वर यांनी या याेजनेची माहिती ‘ॲग्राेवन’ला दिली.
सावळेश्वरकर म्हणाले, की माेबाईल क्रांतीनंतरही अनेक दुर्गम, डाेंगरी खेडी, वाड्या-वस्त्या संपर्काच्या साधनांमुळे विविध सेवा सुविधांपासून वंचित आहेत. या दुर्गम खेड्यातील नागरिकांसाठी पब्लिक डाटा आॅफिस टपाल खात्याच्या वतीने सुरू करण्यात येणार आहे. ज्या ठिकाणी माेबाईल रेंज नाही अशा ठिकाणी विशेष केबल देऊन किंवा उपग्रहाद्वारे डेटाबेस देऊन दाेन- तीन किलाेमीटरच्या परिघामध्ये वाय-फाय देण्यात येणार आहे.
विशिष्ट रक्कम भरून वाय- फाय वापरता येणार आहे. हे पीडीआे स्थानिक बेराेजगरांद्वारे चालविण्यात येणार असून, या माध्यमातून राेजगारदेखील उपलब्ध हाेणार आहे. बंगळुरु येथे प्रायाेगित तत्त्वावर पीडीआे कार्यान्वित करण्यात आली असून, याच धर्तीवर पुणे विभागातील एका खेड आणि त्याच्या वाड्या- वस्त्या वाय- फाय करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment